Diwali Package : रेशनकार्ड धारकांना दिवाळी पॅकेज जाहीर; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : दिवाळी सणात गोरगरिबांसाठी दिलासा देण्यासाठी शिंदे सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल दिवाळीच्या सणासाठी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Diwali package announced for ration card holders a big decision of Maharashtra cabinet)उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"आज आमच्या कॅबिनेटने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड धारकांना म्हणजेच ७ कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने