पुण्याचा विकास रस्त्यावरून वाहतोय; जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचुन छोटी छोटी तळे बनली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुणे बदलत असल्याचं बोलल जात आहे. परंतु पुणे शहराच्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे. नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.



पुण्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागसह दगडू शेठ हलवाई मंदिर, पेठा येथे पाणीच पाणी साचले होते. शहराच्या अनेक भागात गाड्या वाहून गेल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून पालिकेवर टीका केली आहे.

ट्विटमद्धे जयंत पाटील यांनी 'पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे असं म्हंटलं आहे.दरम्यान, आजही पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने