“अमिताभ बच्चन माझ्यावर…. “; अनुपम खेर यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा

मुंबई :  आपल्या अभिनयाने, परखड मतांमुळे कायमच चर्चेत राहणारे अभिनेते म्हणजे अनुपम खेर. सारांशापासून ते आजतागायत गेली अनेकवर्ष ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. सोशल मीडियावरदेखील ते कायम सक्रिय असतात. अभिनेते अनुपम खेर हे अत्यंत दिलखुलास आणि मनमोकळे आहेत, याची प्रचिती अनेकदा प्रेक्षकांना आली आहे. अमिताभ बच्चन त्यांच्यावर का रागवतात याबाबत त्यांनी एका पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.




अनुपम खेर यांचा ऊंचाई चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या संदर्भात एका पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाबद्दल आणि कलाकारांबाबत आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ‘जेव्हा मला कळले की बोमन इराणीला हा चित्रपट करण्यासाठी जमत नाही. तेव्हा मी त्याला फोन करून समजावले की दिग्दर्शकाची इच्छा आहे तुला या चित्रपटात घेण्याची त्यामुळे हा चित्रपट तू करावा आणि तेव्हा तो तयार झाला. बोमनबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर होता आणि अर्थातच अमितजींबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळाच असतो. अमितजी माझ्यावर कायमच रागवतात कारण मी त्यांची कायम स्तुती करतो म्हणून, आखिरी रास्तापासून ते आजतागायत अमितजींबरोबर काम करणे हे माझे भाग्य समजतो’.

अनुपम खरे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. कधी नायक, कधी खलनायक, कधी चरित्र भूमिका अशा वेगवेळ्या रूपात त्यांनी प्रेक्षकांची त्यांनी मने जिंकली आहेत. नुकतीच त्यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आहे.अनुपम खेर यांचा ऊंचाई’ चित्रपट ११ नोव्हेंबर रोजीत्रपटात अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्जोंगपा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. राजश्रीचे सुरज बडजात्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने