ब्रेक फेल नव्हे, ड्रायव्हरची मस्ती नडली; नवले ब्रिज अपघाताचं कारण आलं समोर

पुणेः काल रात्री पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क २४ वाहनांना चिरडले. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु याचं धक्कादायक कारण स्पष्ट झालेलं आहे.साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ अपघात झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना कंटेनरने अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. 



या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घटनास्थळी जात पाहाणी केली. कंटनेनरचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल झालेला असून तो फरार आहे. यादव हा मुळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.हा अपघात ब्रेक फेल झाल्याने घडल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता याबाबत स्पष्टता झालेली असून उतारावर गाडी न्यूट्रल करुन चालवल्याने अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उतारावर इंजिन बंद करुन ड्रायव्हरने गाडी चालवली. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही. ड्रायव्हरच्या या मस्तीमुळे १३ जण जखमी झालेत तर २४ वाहनांचं नुकसान झालंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने