मेहंदीवाल्याचा हिशोब मागता, पण बीकेसी सभेचा हिशोब का मागत नाही?

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची नुकतीच तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर ते अनेक नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे. विरोधकांवरही त्यांनी टीका केली आहे.



जामीन देताना ईडीने संजय राऊतांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं होतं. या आदेशाचा उल्लेख करत सुषमा अंधारे म्हणाल्या, "न्यायालयाने मान्य केलं आहे, राऊतांवरची कारवाई बेकायदेशीर आहे. आता यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी. ईडीकडून राऊतांच्या मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवाल्याचाही हिशोब मागितला जातो. पण मग बीकेसीमध्ये जी सभा झाली. त्यात लाखो रुपये खर्च झाले. तो गट अजून नोंदणीकृत नसतानाही एवढे पैसे कुठून आले? त्याचा हिशोब का नाही मागितला? किरीट सोमय्या त्यावर का बोलत नाहीत? प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना माफिया म्हणत होते. मग आता त्यांच्यावर एफआयआर कधी करणार?"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने