'अर्चनाला थोडी लाज वाटायला पाहिजे' अंकित गेल्यानं नेटकऱ्यांचा संताप

मुंबई: 'बिग बॉस 16' मध्ये रोज नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहे .आपल्या शांत स्वभावा आणि विनोदी वृत्तीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अंकित गुप्ताला शोमधून बाहेर काढण्यात आलं आहे. जेव्हापासून तो शोमधून बाहेर पडणार हे कळालं तेव्हापासून चाहते प्रचंड संतापले आहेत. मात्र यावेळी बिगबॉसपेक्षा जास्त अर्चना गौतमवर पब्लिक संतापले आहेत. बिग बॉसच्या घरात कधी काही होईल सांगता येत नाही. अतिशय शांत स्वभाव असलेल्या अंकित गुप्ताने प्रेक्षकांची मने जिंकली होती सार्वजनिक मतांवर आधारित अंकीता बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागले. प्रियंकाला अंकितच्या जाण्याने दुःख होत आहे. पण त्यावेळी अर्चना गौतमने जे नाटक केले आहे त्याबद्दल तिला ट्रोल केले जात आहे.



प्रोमोध्ये दाखविण्यात आले अंकिताच्या जाण्याने प्रियंका खुप दुःखी आहे. ती फक्त रडते आहे आणि अंकित तीची समजुत काढत आहे आणि अर्चना प्रियंका बद्दल बोलतं आहे. आता ती कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवणार आणि अंकितबदल देखील ती काहीही बोलत आहे. ती अंकीतच्या जाण्याने खूप आंनदी आहे. डान्स करत आहे. तिचा हा डान्स पाहून युजर्स संतापले आहेत.एका युजर्सने लिहिले 'अर्चनाला थोडीपण लाज नाही आहे', 'अंकित ऐवजी या अर्चनाला घराबाहेर काढले पाहिजे', 'मैत्रीच्या नावावर डाग आहे अर्चना' , 'अर्चनापेक्षा चीप कोणी नाही आहे खुप बेकार आहे ', 'बिग बॉसने चुकीचं केलं आहे,या अर्चनाची लाईकी नाही आहे या घरात राहण्याची' अशा अनेक कमेंट करत नेटकरी आपला संताप व्यक्त करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने