"ड्रोन शॉटच्या लायकीचाही नव्हता"; मोर्चा संपताच फडणवीस माध्यमांसमोर

मुंबई: महाविकास आघाडीचा महामोर्चा हा नॅनो मोर्चा होता, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली आहे. महापुरुषांबद्दल भाजपा नेत्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा संपताच देवेंद्र फडणवीसांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.



या मोर्चावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, "तीन पक्ष असूनही इतका छोटा मोर्चा काढला. आज कोणीही ड्रोन शॉट दाखवले नाहीत. सगळे क्लोज शॉट दाखवावे लागले. कारण हा मोर्चाच एवढा छोटा होता. आम्ही त्यांना म्हटलं होतं की आझाद मैदानावर या , पण मैदान भरणार नाही, हे त्यांना माहित होतं, म्हणून त्यांनी मुद्दाम मोर्चासाठी निमुळती जागा निवडली."

या मोर्चाबद्दल बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, "आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा होता. जे संतांना, वारकरी सांप्रदायाला शिव्या देतात. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला माहित नाही, असे लोक कुठल्या तोंडाने मोर्चा काढतात? माझा शिवसेनेला सवाल आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान होत होता, तेव्हा का नाही मोर्चा काढला, काँग्रेसला हा सवाल आहे. सावरकर मोठे नव्हते का?"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने