'कांतारा'वरुन दोन दिग्गजांमध्ये जुंपली!

मुंबई: बॉलीवूडमधील प्रतिभावान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यात वाद होणे एकमेकांना टोमणे मारणे हे काय नवीन नाही. ते नेहमीच एकमेकांवर वेगवेगळे आरोप करुन लक्ष वेधून घेत असतात. मध्यंतरी या दोघांमध्ये 'द काश्मीर फाईल्स'चित्रपटातचा ऑस्कर पुरस्कार वरून शाब्दिक वाद झाले होते.आता सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांच्यात ट्विटरवर शाब्दिक वाद सुरू झाले आहे. नुकतेच दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीदरम्यान कांतारा आणि पुष्पा सारखे चित्रपट इंडस्ट्रीला उद्ध्वस्त करत असल्याचे विधान केले होते. त्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अनुराग कश्यपच्या या विधानाचा स्क्रीनशॉट शेअर करताना आपली असहमती दर्शवली आहे. विवेकने केलेल्या ट्विटनंतर अनुराग कश्यपने आपला मुद्दा मांडला या दोघांमध्ये इतके शाब्दिक वाद वाढले की एकमेकांच्या चित्रपटावर ताशेरे ओढले.



अनुराग कश्यपच्या पुष्पा आणि कंतारा यांच्या वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्रीने एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये अनुराग कश्यपच्या मुलाखतीचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, 'मी बॉलीवूडवरील या विधानाशी पूर्णपणे असहमत आहे, महाराज. तुम्ही याच्याशी सहमत आहात का?अनुराग कश्यपने शांत न बसता लगेच ट्विटला प्रतिउत्तर दिले अनुराग कश्यप यांनी ट्विट केले की, 'सर, तुमची चूक नाही. तुमच्या चित्रपटांचे संशोधनही माझ्या तुमच्या ट्विटसारखे आहे. तुमची आणि तुमची मीडियावर तीच अवस्था आहे. काही नाही पुढच्या वेळी पूर्ण माहिती काढून संशोधन करा".विवेक अग्निहोत्रीने परत अनुराग कश्यपला दोबारावर चित्रपटाला घेऊन टोमणा मारला.चित्रपटाच्या संशोधनावर अनुराग कश्यपच्या ट्विटनंतर विवेक अग्निहोत्री स्वत:ला रोखू शकला नाही आणि दिग्दर्शकाच्या ट्विटला उत्तर देताना त्याने तापसी पन्नू आणि दोबारा चित्रपटाची खिल्ली उडवली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने