मुंबई: सोमवारी आलेल्या आकडेवारीतून किरकोळ महागाई कमी झालेले दिसत असले, तरी गेल्या वर्षभरात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १४ टक्क्यांनी महागाई झाली आहे.
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारी जाहिर केलेल्या किंमती आणि मागच्या वर्षीच्या किंमती
तांदूळ - ३८.०७ रुपये किलो, जी गेल्या वर्षी याच तारखेला ३५. २७ रुपये किलो होती.
गहू - ३१. ८७ रुपये आहे तर मागच्या वर्षी २७.०९ रूपये होता.
तूरडाळ - आता ११२.३८ रुपये, मागच्या वर्षी १०२.७५ रुपये
उडिद डाळ - आता १०८.२६ रुपये, मागच्या वर्षी १०६.२० रुपये
मूग डाळ - आता १०३.८६ रुपये, मागच्या वर्षी १०१.६६ रुपये.
मागच्या वर्षी १२ डिसेंबर २०२१ ला मीठाचा भाव १८.७८ रुपये होता. जो सोमवारी वाढून २१.५१ रुपयांवर पोहचला.
बटाटा २३.०४ रुपयांवरून २६.६० रुपये झाला आहे.
सुर्यफूल तेल १५१.८८ रुपयांवरून १६९.७४ रुपये प्रती लिटर झालं आहे.
तर सोयाबिन तेल १४६.७० रुपयांवरून १५३.९१ रुपये लिटर झालं आहे.