डोक्यावर छप्पर होतं ना खाण्यासाठी अन्न…,सलमानच्या वडीलांनी पालटलं नशीब

मुंबई:  आज जावेद अख्तर यांचा वाढदिवस आहे. ते 78 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटाला वेगळे स्थान मिळवून दिले आहे. जावेद अख्तर यांचा जन्म 17 जानेवारी 1985 रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध कवी जन्नीसार अख्तर होते. इतकंच नाही तर जावेद यांचे आजोबा मुज्तार खैराबादी हेही प्रसिद्ध कवी होते.जावेद यांची आई सफिया अख्तर याही प्रसिद्ध लेखिका होत्या. इतके प्रसिद्ध कवी घराणे असूनही जावेद साहेबांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली. कधी न खाता, तर कधी हरभरा खाऊन भूक भागवली. पैसे नसताना ते पायी प्रवास करायचे.






जावेद अख्तर यांनी 1964 मध्ये शिक्षणानंतर मुंबई गाठली. मात्र मुंबईत राहायला जागा नसल्याने त्यांनी अनेक रात्री झाडाखाली काढल्या. ते बराच काळ बेघर राहिले. 2 वर्षे ते तसेच भटकत राहिले. शेवटी त्यांना कमाल अमरोहीच्या स्टुडिओत राहायला जागा मिळाली. तरीही त्यांचे काम होऊ शकले नाही. ते कामासाठी भटकत राहिले.रिपोर्ट्सनुसार, राहण्यासाठी जागा मिळाल्यानंतरही त्यांना स्वतःचे पोट भरणे कठीण जात होते. कारण त्यांना नोकरी नव्हती. दरम्यान, त्यांनी आपली कौटुंबिक लेखन परंपरा वाढवली आणि संवाद लिहिण्यास सुरुवात केली. महिन्याला 100 रुपये घेऊन संवाद लिहायला सुरुवात केली. यातही त्यांचे काम चालले नाही, म्हणून ते लहानमोठ्या नोकऱ्या करत असे.

मोठ्या कुटुंबातून आलेल्या जावेद अख्तरसाठी हे फारच कमी होतं. भूक भागवण्यासाठी ते हरभरा खाऊन अनेक वेळा झोपायचे. जावेद यांचा मार्ग सोपा नव्हता. पण 1969 साली पहिला मोठा ब्रेक मिळाला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी सलीम खान यांच्याशी हात मिळवला. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षक आणि बॉलिवूडला खूप आवडते. दोघांनी मिळून जवळपास 24 चित्रपटांमध्ये संवाद लिहिले.पुढे जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्यात वैयक्तिक कारणावरून मतभेद झाले. जावेद यांनी ही जोडी तोडली आणि गीतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 'लगान', 'वीर-जारा', 'कल हो ना हो' या सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने