उदयपूरमध्ये पतंग उडवण्यास बंदी! १४४ कलम लागू

 उदयपूर : राजस्थानातील उदयपूर इथं मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पंतग उडवण्यासाठी पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी इथं १४४ कलमही लागू करण्यात आलं आहे. ३१ जानेवारीपर्यंत हे निर्बंध शहरात कायम असणार आहेत.उदयपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रभा गौतम म्हणाले, दुचाकी चालकांचा आणि पक्षांचा जीव वाचवण्यासाठी शहरात पतंगबंदी यासाठी करण्यात आली आहे. कारण या पतंगांच्या मांज्यामध्ये धातूमिश्रीत पदार्थ वापरले जातात.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने