मुंबई: युपीआय पेमेंटला भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलं. त्यानुसार, सन २०२२ मध्ये भारतीयांनी १२६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.सीतारामण म्हणाल्या, युपीआय पेमेंट व्यवस्था आता भारतात औपचारिक बनल्याचं EPFO सदस्यत्वातून दिसून आलं आहे. यामध्ये दुप्पट वाढ झाली असून ती २७ कोटींपर्यंत पोहचली आहे. यामध्ये ७,४०० डिजिटल पेमेंट्स झाले असून १२६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.