"लग्न करणं गरजेचंच आहे का?"; प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न

मुंबई: प्राजक्ता श्री श्री रविशंकर यांना विचारते, “लग्न करणं गरजेचंच आहे का?”. यावर श्री श्री रविशंकर यांनी उत्तर दिलं की, “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही. खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटं खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. तसेच एकटं राहिले तरी दुःखीच असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.”



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने