'मी जिंकणार असा विश्वास पण..' हरल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई: रिअॅलिटी शो 'बिग बॉसच्या 16व्या सिझनला त्याचा विजेता मिळाला. सगळ्यानांचा धक्का बसला जेव्हा सलमान खानने एमसी स्टॅनच नावं विजेता म्हणुन घोषित केलं. याचे कारण म्हणजे त्यांची जोरदार फॅन फॉलोइंग आहे, सुरुवातीच्या काही आठवडे त्यांना या शोमध्ये रस नव्हता.मात्र, अखेरपर्यंत त्याच्या विनोदी चर्चा लोकांना आवडू लागल्या होत्या. त्यांचे खरे व्यक्तिमत्व लोकांच्या हृदयाला भिडले आणि तो विनर झाला.याचा आनंद तर आहेच मात्र दुसरीकडे शिव ठाकरेच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. शिव चेहऱ्यावरुन दाखवत नसला तरी त्याला याचे दुख: आहे हे नक्कीच.



शिव ठाकरेचा खेळ सुरुवातीपासून मध्यापर्यंत चांगलाच होता, मात्र तो शेवटपर्यंत थोडा सुरक्षित खेळ खेळतांना दिसला.फायनलमध्ये जरी तो ट्रॉफी जिंकू शकला नसला तरी तो संघात आला याचा आनंद आहे. अंतिम फेरीनंतर तो म्हणाला की तो एक चांगला खेळाडू आहे, पण एमसी स्टॅन हा खरा माणूस आहे.शिवाने मिडियाशी संवाद साधतांना बोललं आणि म्हणालं, 'साहजिकच मला जिंकण्याची अपेक्षा होती. मी खूप उत्कटतेने खेळ खेळलो आणि जिंकताना नेहमीच कामगिरी केली.

एखाद्या मुद्यासाठी आवाज उठवणे असो किंवा कोणत्याही कामात माझं बेस्ट देणं असो, मी माझं 100 टक्के दिले आहे. किमान हिंदी प्रेक्षक मला ओळखत आहेत यातच मी आनंदी आहे.त्यानंतर बाहेर आल्यावर सलमान बद्दल बोलतांना तो म्हणाला की सलमान त्याच्यासाठी देवापेक्षा कमी नाही.त्यांने सलमानला पाहूनच बॉडि बनवली आणि आज त्याच्यासोबत राहून खुप आंनद झाला. बाहेर आल्यावरही त्यांची आणि एम सी स्टॅनची मैत्री तशीच दिसली. त्यादोघांनीही मिडियासमोर एकत्र पोझही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने