पगार न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य

सांगली: सांगली जिल्ह्यात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. तर आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भीमराव सूर्यवंशी असं एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते.भीमराव सूर्यवंशी यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर काम करत होते. न्यायालयाचा आदेश असूनही पगार वेळेत होत नसल्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी तणावाखाली आहेत. सूर्यवंशी देखील तणावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने