मुंबई: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनिरुद्ध या पात्राचा सध्या आपल्या सगळ्यांना नेहमीपेक्षा जास्त राग येत असावा. अरुंधतीच्या लग्नात तो जे काही अडथळे आणत होता किंवा त्यांनतरही त्याचं जे काही हे लग्न तोडण्यासाठी सुरु आहे हे सगळं ऐकून कसला माणूस आहे म्हणत तुम्ही त्या अनिरुद्धला हिणवतच असाल.पण हे अनिरुद्ध पात्र रंगवणारा मिलिंद गवळी मात्र प्रत्यक्षात एकदम विरोधी स्वभावाचा आहे. त्याला स्वतःला हे अनिरुद्ध पात्र आवडत नाही,..म्हणजे माणूस म्हणून बरं का.. हे त्यानं देखील सांगितलं आहे.
मिलिंद गवळी अनिरुद्ध म्हणून जेवढा चर्चेत येतो त्याहून अधिक तो सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट केलीय त्यात त्यानं मराठीत आधी रडकेच चित्रपट का बनायचे...निर्मात्यांचे त्यामागे काय गणित असायचे याविषयी खुलासा केला आहे.आता मिलिंद गवळी अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे. मराठी हिंदी मालिका,सिनेमा यामधून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत त्यानं आपलं नाव कमावलं आहे. यातले मिलिंदचे जर आधीचे काही सिनेमे पाहिले असतील तर बऱ्यापैकी रडकेच...आता मिलिंदलाही तेव्हा तो प्रश्न पडायचा..मराठीत रडके सिनेमे का बनतात..आणि बरं बनतात ते बनतात ते चालतात कसे...
पण तरिदेखील तो विचार करायचा..मनोरंजन लोकांना हसवण्यासाठी असावं रडवण्यासाठी नाही..तेव्हा त्यानं त्या काळातील एका बड्या मराठी निर्मात्याला न राहवून हा प्रश्न विचारलाच की मराठीत आपण रडके चित्रपट का बनवायचे तेव्हा त्या निर्मात्यानं दिलेलं उत्तर नुकतंच मिलिंदने पोस्टच्या माध्यमातून लोकांसमोर सांगितलं आहे.सोबत रडणं माणसासाठी किती आवश्यक आहे हे सांगताना त्याचं महत्त्व देखील पटवून दिलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला आहे मिलिंद आपल्या पोस्टमध्ये रडावसं वाटलं तर माणसाने रडावं मन मोकळं करावं असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात ,मनाला दुखावणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात ,आपल्या मनाला त्याचा त्रास होत असतो आणि ते सतत चालू असतं.आणि खूप आतल्या आत आपण साठवून ठेवत असतो,मग अचानक बांध फुटतो आणि आपण उपसाभक्षी ढसाढसा रडायला लागतो आणि मग रडून झालं की मन शांत होत , आपल्याला बरं वाटतं