कर्णधार रोहित पहिला वनडे सामना का नाही खेळणार; मोठे कारण आले समोर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. तीन वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईत होणार आहे पण रोहित शर्मा त्यात खेळणार नाही. टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर असल्याची बातमी आधीच आली होती. पण तो का खेळणार नाही याचे कारण आता समोर आले आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी त्याच्या जागी हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत कर्णधारपद भूषवणार आहे. मात्र त्यावेळी या निर्णयामागील कारण सांगण्यात आले नव्हते.



सोशल मीडियावर रोहित शर्मा पहिल्या एकदिवसीय सामन्यात न खेळण्यामागील कारणानुसार, तो आपल्या भावाच्या लग्नाला जाणार आहे. त्यामुळे तो पहिल्या वनडे सामना खेळणार नाही.रोहित शर्माने अलीकडेच श्रेयस अय्यरसह त्याचा सहकारी शार्दुल ठाकूरच्या लग्नात हजेरी लावली होती. शार्दुलच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर मालिकेतील चौथी आणि शेवटची कसोटी खेळण्यासाठी तो अहमदाबादला गेला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने