नवी दिल्ली: मिझोरम हे देशातील सर्वात आनंदी राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुरुग्रामयेथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील स्ट्रॅटेजीचे प्राध्यापक राजेश के पिलानिया यांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.अहवालानुसार १०० टक्के साक्षरता साध्य करणारे हे राज्य भारतातील दुसरे राज्य आहे. आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीतही प्रगती करण्याची संधी राज्यात देण्यात येते.
अहवालात म्हटले की, मिझोराम हॅपिनेस इंडेक्स 6 निकषांवर आधारित आहे. यामध्ये कौटुंबिक नातेसंबंध, कामाशी संबंधित मुद्दे, सामाजिक आणि लोकांच्या हिताचे मुद्दे, धर्म, कोविड-19 चा आनंदावर होणारा परिणाम, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश आहे.मिझोराममधील आयझॉल येथील गव्हर्नमेंट मिझो हायस्कूलच्या (जीएमएचएस) एका विद्यार्थ्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, कारण त्याचे वडील लहान असतानाच त्याच्या कुटुंबाला सोडून गेले. असे असूनही तो आशावादी असून अभ्यासात प्राविण्य मिळवतो. त्यांची पहिली पसंती चार्टर्ड अकाउंटंट किंवा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळविण्यास आहे.
त्याचप्रमाणे जीएमएचएसमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीत (एनडीए) प्रवेश घेण्याची इच्छा आहे. त्याचे वडील डेअरीत काम करतात आणि आई गृहिणी आहे. शाळेमुळे दोघेही आपल्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत.एका विद्यार्थ्याने सांगितले की, आमचे शिक्षक आमचे चांगले मित्र आहेत, आम्ही त्यांच्याशी काहीही शेअर करण्यास घाबरत नाही किंवा लाजत नाही. अहवालात पुढे म्हटले आहे की, मिझो समुदायातील प्रत्येक मूल, हे आपण मुलगी आहोत की मुलगा याची पर्वा न करता, लवकर कमाई करण्यास सुरवात करतात.
राज्यात कोणतेही काम लहान मानले जात नाही. तसेच युवकांना साधारणत: वयाच्या १६ किंवा १७ व्या वर्षी रोजगार मिळतो. त्याला प्रोत्साहन दिले जाते आणि मुला-मुलींमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही.मिझोराममध्ये विभक्त कुटुंबांची संख्या जास्त आहे, परंतु समान परिस्थितीत अनेक समवयस्क असणे, नोकरदार माता आणि लहान वयातच आर्थिक स्वावलंबन असल्यामुळे येथे मुले वंचित राहत नाहीत. 'स्त्री-पुरुषांना उदरनिर्वाह करायला आणि एकमेकांवर अवलंबून राहायचं नाही, हे शिकवलं जात.