'कुणाला घाबरत नाही, पुन्हा येणार'! रिया चक्रवर्तीनं दिलं नेटकऱ्यांना आव्हान

मुंबई:  बॉलीवूडचा प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग आत्मत्या प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली होती. त्यानंतर तिच्या नावाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. नेटकऱ्यांनी देखील तिच्यावर कडाडून टीका केली होती. आता रियानं तिला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.सुशांत सिंग च्या आत्महत्या प्रकरणाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतरही रियाला सतत सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. 



तिला बॉलीवूडमध्ये प्रोजेक्ट मिळणंही बंद झाल्याचे तिनं सांगितले होते. यावर तिनं आता नेटकऱ्यांना ठणकावून सांगितलं आहे. अनेकांना असे वाटत आहे की, त्या प्रकरणानंतर तिचे करिअर संपले आहे. त्यालाच आव्हान देत अभिनेत्रीनं आपण पुन्हा कमबॅक करणार असल्याचे सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.रिया ही आता एमटीव्ही रोडीज १९ मध्ये दिसणार आहे. तिच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांना ती म्हणते की, अजूनही माझा द्वेष, तिरस्कार करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, मी पुन्हा येते आहे. तुम्हाला काय वाटले मी पुन्हा येणार नाही का, पण तसे होणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मला कुणाला घाबरावे असे वाटत नाही. अशा शब्दांत रियानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२०२० मध्ये सुशांत सिंहन या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर सुशांत सिंहच्या कुटूंबियांनी रिया चक्रवर्तीवर आरोप करत पोलिसांनी तिची चौकशी करावी अशी मागणी केली होती. सुशांतच्या आत्महत्येमध्ये तिचा सहभाग असल्याचा आरोप सुशांत सिंहच्या कुटूंबियांनी तिच्यावर केला होता. आता तीन वर्षानंतर रिया ही एका शो मधून चाहत्यांसमोर येताना दिसते आहे.रियानं सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगितले आहे. त्यामध्ये तिनं आपण रोडिजमधून कमबॅक करत असल्याचे म्हटले आहे. मेकर्सनं देखील ती पोस्ट शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर तिला चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने