"भ्रष्टचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसलेले फडणवीस भिजलेली काडतूस फेकून मारतात"

मुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील गृह मंत्रालय सूडाच्या भावनेने काम करत आहे. यावेळी त्यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे मारहान प्रकरणावरुन देखील शिंदे-फडणवीसांवर टिका केली.संजय राऊत म्हणाले, संजय राऊत म्हणाले हे भिजलेले काडतूस आहे. १० वेळा यांनी त्यांची आई बदलली आहे. बेईमान लोकांना मंत्री बनवण्याची भाजपला सवय आहे. यामध्ये नारायण राणे, एकनाथ शिंदे आहेत. यांची राजकारणात आणि समाजात काहीच प्रतिष्ठा नाही. 



राहुल कुल आणि दादा भुसेंवर कारवाई का केली नाही. ईडी- सीबीआय राजकीय विकोधकांच्या बाबतीत चुकीचा वापर केला जातो ही आमची भूमिका आहे. भाजपच्या वाशिंग मशिनमध्ये टाकलेल्या लोकांवर कारवाई का होत नाही. मी गेल्या १५ दिवासत गृहमंत्री आणि सीबीआय आणि ईडीकडे ५०० कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत तरी कारवाई होत नाही, असे राऊत म्हणाले. फडणवीस काडतूस असतील तर त्यांनी ते काडतूस भ्रष्टाचाऱ्यांच्या कुठे घालायाचे ते घाला. तर तुम्ही खरे गृहमंत्री आहात. भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसलेले फडणवीस विरोधकांना काडतूस फेकून मारतात ते पण भिजलेली. यांना काहीही प्रतिष्ठा नाही बेकायदेशीरपणे काम सुरू आहे. गुंडाना भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. हे सरकार गुंड टोळ्या आहेत, अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने