'प्रश्न सुटत नसेल तर आमदार, खासदारांना मारा'; प्रकाश आंबेडकरांचं धक्कादायक वक्तव्य

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना अजब असा सल्ला दिला आहे. ते बोलताना म्हणाले की, मी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार आणि खासदारांना मारा. निवडून दिलेले अनुसूचित जाती, जमातीचे आमदार आणि खासदार प्रश्न सोडवण्यता कच खात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना बडवावे, असं धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना अजब असा सल्ला दिला आहे. ते बोलताना म्हणाले की, मी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार आणि खासदारांना मारा. निवडून दिलेले अनुसूचित जाती, जमातीचे आमदार आणि खासदार प्रश्न सोडवण्यता कच खात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना बडवावे, असं धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.हक्काच्या फेलोशिपसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आझाद मैदानात त्यांनी भेट घेतली. शिक्षणातून नवीन पिढी उभी राहत असते. त्यासाठी आंदोलन करावं लागणं दुर्दैवी आहे. इतर संस्थांच्या मागे निवडून दिलेले प्रतिनिधी उभे राहतात, त्यांना हाताखाली घेतल्याशिवाय विषय सुटणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.



शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटले. महाविकास आघाडीची एकजूट राहील की नाही याबाबत उद्धव ठाकरेंना विचारा, असं आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. राष्ट्रवादीची भूमिका बदलली आहे. सर्व पक्ष जेपीसी मागत आहेत आणि राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आहे. अजित पवार यांनी पंतप्रधानांनाही क्लीन चीट दिली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटले. महाविकास आघाडीची एकजूट राहील की नाही याबाबत उद्धव ठाकरेंना विचारा, असं आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. राष्ट्रवादीची भूमिका बदलली आहे. सर्व पक्ष जेपीसी मागत आहेत आणि राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आहे. अजित पवार यांनी पंतप्रधानांनाही क्लीन चीट दिली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने