रवी शास्त्री म्हणाले, “कुणीही खेळण्यासाठी क्वालिफाय करू शकतो. पण मला वाटतं की हार्दिक संघाचं नेतृत्व करेल. पुढील दोन वर्ल्डकप (२०२३ वनडे वर्ल्डकपनंतर) टी-२० क्रिकेटचे आहेत. तो आधीपासूनच भारताचा कर्णधार (टी-२० मघ्ये स्टॅंडबाय) आहे. जर तो अनफिट नसेल, तर त्याचं काम करत राहील. अशातच मला वाटतं की, निवड समिती एका नव्या दिशेनं पावलं उचलतील. सध्याच्या घडीला युवा खेळाडूंमध्ये खूप टॅलेंट आहे. तुमच्याकडे नवीन संघ असू शकतो. नाहीतर काही नवीन चेहरे नक्कीच असतील. भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळणारे खेळाडूही असतील. पण नवीन खेळाडूही संघात सामील होतील. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये नवख्या खेळाडूंनी चमकदार कमगिरी केली आहे.”
शास्त्री पुढे म्हणाले, “मला असं वाटतंय की, ते २००७ च्या मार्गाने जातील. जिथे निवड समितीकडून टॅलेंटला प्राधान्य दिलं जाईल आणि निवडीच्या बाबतीत हार्दिककडे अनेक विकल्प असतील. कारण त्याचे विचार वेगळे असतील. त्याने एका फ्रॅंचायजीच्या कर्णधाराच्या रुपात आयपीएल खेळलं आहे आणि अनेक अन्य खेळाडूंना पाहिलं आहे. त्याच्याकडे त्याचे इनपूट असतील.”