आ जकाल अनेक जण केसगळतीच्या समस्येने हैराण झालेले पाहायला मिळतात आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे त्याचप्रमाणे ताणामुळे केसगळतीचेप्रमाण वाढले आहे. केसगळती झाल्याने लोक अनेक गोष्टी ट्राय करतात. अशा परिस्थितीत रोज केस धुणे, केसांना तेल लावणे या गोष्टींचा थेट परिणाम केसांवर होतो का असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात असतात. यावरच त्वचातज्ज्ञ डॉ जयश्री शरद यांनी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
शॅम्पू बदलल्याने केस गळणे थांबते का?
शॅम्पू बदलल्याने केस गळणे टाळता येते हे तुम्ही ऐकले असेलच. पण तज्ञांच्या मते, हे सत्य नसून केवळ एक मिथक आहे. “शॅम्पू तुमच्या टाळूला स्वच्छ करण्यासाठी असतात . कोरड्या किंवा स्निग्ध आणि हवामानानुसार टाळूच्या स्थितीनुसार तुम्ही तुमचा शॅम्पू बदलला पाहिजे. पण शॅम्पू बदलल्याने केस गळणे नियंत्रित होणार नाही,” त्यामुळे तुमचा शॅम्पू काळजी पूर्वक निवडा.
रोज शॅम्पू केल्याने केस गळतात का?
डॉ जयश्री यांच्या मते आपण सर्वांनी हे ऐकले आहे आणि त्यामुळेच आपल्यापैकी बरेच जण आपले केस रोज शॅम्पू करणे टाळतात. डॉक्टर सांगतात की "जर तुमची टाळू प्रदूषण, घाण किंवा तुमच्या टाळूवर घाम साचत असेल, तर तुमचे केस स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला दररोज केस धुणे आवश्यक आहे.
सल्फेट शॅम्पू केसांसाठी हानिकारक असतात का?
तज्ज्ञांने उघड केले की ही फक्त एक मिथक आहे कारण सल्फेट हे एक साफ करणारे एजंट आहे जे टाळूतील घाण आणि तेल साफ करण्यास मदत करते. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडला पाहिजे. तुमच्या केसांना सुट होणारा शॅम्पू वापरा.
प्रत्येक केसाला शॅम्पू लागेल याची काळजी घ्या
तुम्हीही हे ऐकले असेल पण सत्य हे आहे की तुम्ही तुमच्या टाळूला शॅम्पू लावलाच पाहिजे.शॅम्पू तुमच्या केसांच्या पट्ट्यांऐवजी टाळूवर लावावा कारण ते घाण, काजळी,तेल आणि मृत त्वचा तयार होण्यापासून मुक्त होण्यासाठी आहे. डॉ जयश्री यांनी माहिती दिली.