मुंबईकरांवर पाणी संकट, मान्सूनला उशीर झाल्याने तलाव कोरडे, पाहा किती दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

मुंबई: जून महिन्याचे अवघे १० दिवस शिल्लक असताना बहुप्रतिक्षित मान्सूनचे अद्याप शहरात आगमन झालेले नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आवश्यक प्रमाण, राज्य सरकारने ठेवलेला राखीव साठा वगळता एकूण ७.७% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर पावसाला आणखी उशिर झाला तर जुलैपर्यंत पाणीकपात लागू केली जाऊ शकते, असा इशारा बीएमसीने दिला आहे.

मुंबईत तसं बघायला गेलं तर कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. मात्र, नागरिकांनी निसर्गाच्या या देणगीला गृहीत धरू नये. याआधी काही कोरडे पावसाळे झाले होते, परंतु शहराने त्यावर उपाय काढला होता.



जर वर्षभर मुंबईत पाणीकपात करायची नसेन तर पाणीपुरवठा करणारे तलाव हे १४.४७ लाख दशलक्ष लीटर भरायला हवेत. पण, मंगळवारपर्यंत, एकूण पाणीसाठा १.५९ लाख दशलक्ष लिटर (१३.९%) आणि राखीव साठ्याशिवाय १.११ लाख दशलक्ष लिटर (७.७%) इतका होता. २० जून २०२२ रोजी एकूण पाणीसाठा १०.५% होता आणि त्याच तारखेला २०२१ मध्ये पाणीसाठी १४.१६% होता.

नागरी अधिकार्‍यांनी सांगितले की १% साठा शहराच्या तीन दिवसांच्या पाण्याच्या गरजेसाठी पुरेसा आहे, त्यामुळे सध्याचं पाण्याचं प्रमाण पाहता सध्या तलावात शहराला ४२ दिवस पुरेस इतका पाणीसाठा आहे.

२३ जूनला मुंबईत मान्सून धडकणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत येत्या २३ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, येत्या २७-२८ तारखेपर्यंत चांगला पाऊस पडेल अशी शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने