महाविकास आघाडीने केला सत्ता स्थापनेचा दावा

राज्यपालांकडे पत्र सादर : अपक्षांसह १६२ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या . 

मुंबई: शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह १६२ आमदाराच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी .अशी विनंती करणारे पत्र सोमवारी राजभवनात सादर केले. 
शिवसेनेचे एकनाथ शिंदे , राष्ट्रवादीचे जयंत पाटील व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी १६२ आमदारांच्या सह्याचे पत्र दिले.ल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीत असल्यामुळे त्याच्या कार्यालयात हे पत्र सादर केले. यावेळी अशोकजी चव्हाण, खा. विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, के. पी. पाडवी , आदी उपस्थित होते. 
२३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली: परंतु पूर्वी  विधानसभा सदस्याचे पुरेसे संख्याबळ नसल्यांमुळे सरकार स्थापण्यास असमर्थता दाखवली होती. आज देखील त्याच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. ते  बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरतील त्यामुळे आत्ताच सरकार स्थापनेचा दावा करीत आहोत. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस, व सहयोगी अपक्ष सदस्य यांची सह्यनिशी यादिसँट जोडत आहोत. सरकार स्थापनकारण्यास आमच्याकडे पुरेसे पाठबळ आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तत्काळ पाचारण करावं . अशी विनंती त्यांनी राज्यपालकडे केली.


दूध का दूध - पाणी का पाणी 
एकनाथ शिंदे म्हणाले कि, फडणवीस  यांनी घेतलेली शपथ लोकशाही विरोधी आहे . त्याच्याकडे पुरेसे संख्याबळ असून , राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नाही. आता विधानसभेत आम्ही दूध का दूध पाणी का पाणी सिद्ध करू. 

भाजप कडे संख्याबळ नाही 
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे कळवले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिवसेना व राष्ट्रवादीला बोलावण्यात आले होते.; 

असे असताना पुरेसे संख्याबळ भाजपकडे कुठून आले. असा सवाल करून ,आजही भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही असा दावा जयंत पाटील यांनी केला.  

थोडे नवीन जरा जुने