राष्ट्रवादीने ‘ यामुळे ‘ नाकारले होतं मुख्यमंत्रीपद ।

राष्ट्रवादीने ‘ यामुळे ‘ नाकारले होतं मुख्यमंत्रीपद । 
अजित पवारांना दोनवेळा मुख्यमंत्रीपद हुलकावणी दिली. यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. आणि त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णयही घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण भाजपसोबत जाण्याच्या एकतर्फी निर्णयामुळे अजित पवार आता उपमुख्यमंत्री पदापासूनही दूर गेले आहेत. 
मुंबई: प्रदीर्घ काळ लांबलेल्या सत्तापेचानंतर राज्यात भाजपला बाजूला ठेऊन शिवसेना- काँग्रेस- आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापना केले. मात्र सत्तास्थापनेपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यामंत्रीपदाची घेतलेली शपथ चांगलीच गाजली. मुख्यमंत्री मिळत नसल्याच्या नाराजीतून अजित पवार यांनी भाजपसोबत जाणे पसंद केल्याच्या चर्चा त्यावेळी राजकारणात रंगल्या होत्या. आता शरद पवार यांनीच राष्ट्रवादीने आघाडीच्या काळात मुख्यमंत्री का नाकारले , यावर आपली भूमिका स्पष्ट केली . 
युती सरकार २०१४ मध्ये येण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. १५ वर्ष आघाडीने राज्याचा कारभार पहिला. या कालावधीत राष्टवादीला विधानसभेला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. तसेच ज्या पक्षाच्या जागाच अधिक त्याला मुख्यमंत्रीपद हि ठरलं होत. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. तसेच अजित पवार यांचे नावही चर्चेत आले होते. मात्र पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद य घेता मुख्यमंत्री वाढवून घेतली होती. राज्यात पक्ष विस्तार करण्याचा आपला उद्देश होता. त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसला दिल्याचे पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीने राज्यात मोठे संघटन निर्माण केले होते. 
दरम्यान महाविकास आघाडीत सामील होताना राष्ट्रवादीला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य होत . किंबहुना शिवसेनेने तयारीही दाखवली होती, परंतु, यावेळी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार देत उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास सांगितले. त्यामुळे आत्ताही पवार यांचा भर पक्षविस्तारावर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
दुसरीकडे अजित पवार याना दोनवेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. यामुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. किंबहुना त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र भाजपसोबत जाण्याचा एकतर्फी निर्णयामुळे अजित पवार आता उपमुख्यमंत्री पदापासूनही दूर गेले आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह सर्वाधिक १६, शिवसेनेला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळणार आहे. 


थोडे नवीन जरा जुने