२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र

२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र 
भारतविरुद्धवेस्ट इंडिज यांच्यातील २० -२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतून टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे. यापुढील प्रत्येकी २०-२० मालिका हि वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमिर्तीनं सर्व खेळाडूसाठी महत्वाची असणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण दमदार कामगिरी करून टीम इंडियात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल हे नक्की , पण कर्णधार विराट कोहलीन गुरुवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाबद्दल महत्वाची माहिती दिली. त्यांन आगामी २०-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या सगहत केवळ एकाच जलदगती गोलंदाजाची जागा रिक्त असल्याचे संकेत दिले 
वेस्ट इंडिजविरुद्धच्या  सामन्यापूर्वी पत्रकारांना प्रश्नांना सामोरे जाताना विराटने हि माहिती दिली. तो म्हणाला “वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात एका स्यानासाठी चुरस आहे. आणि जवळपास तीन गोलंदाजानी आपलं स्थान पक्के केलं आहे. हि चुरशीची स्पर्धा होणार आहे. आणि यात कोण बाजी मारत हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल . भुवनेश्वर कुमार , जसप्रीत बुमराह हि अनुभवी जोडी आमच्याकडे आहे. २० -२०  क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे. दीपक चहरही चांगली कामगिरी करत आहे. 
रिषभ पंतला विंडीज मालिकेत महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्याची संधी. 
विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यात पुन्हा चढाओढ 
तो पुढे म्हणाला , मोहोम्मद शमीने झोकात पुर्नगमां केलं आहे. ट्वेन्टी -२०क्रिकेट मध्ये कशा प्रकारची गोल्डाझी अपेक्षित आहे,, हे त्यानं समजून घेतलं तर तो ऑस्ट्रेलियातिल खेळपट्टीवर उपयुक्त ठरू शकेल . तसेच त्यानं कसौटीत चांगला जम बसवला आहे.

                  एक षटकार आणि रोहित शर्मा बसणार विक्रमाच्या शिखरावर ।

कोहली वक्त्यावरून बुमराह , कुमार आणि शमी याचे वर्ल्ड कप संघातील स्थान पक्के असल्याचा तर्क लावला हात आहे. शमीन २०१७ मध्ये अखेरचा आंतरराष्टीय  सामना खेळला होता. भुवीही दुखापतीतुन सावरताना संघात कमबॅक करत आहे. त्यांनीही ऑगस्ट मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा ट्वेंटी -२० सामना खेळाला होता . कोहली म्हणाला “ तीन प्रामुक्ख गोलंदाजासह एका जागेसाठी अनेक गोलंदाजाची चाचणी होईल . प्रत्येक जण सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. 
थोडे नवीन जरा जुने