मुंबई : आपल्याकडे आजही मूळ प्रवाहातील चित्रपट आणि प्रादेशिक चित्रपट यात फरक केला जातो. आता कुठे ही परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे, तरी कमर्शियल चित्रपटांसमोर प्रादेशिक चित्रपट दबले जातात हे सत्य नाकारून चालणार नाही. पण तरी काही चित्रपटांनी व्यावसायिक चित्रपटांना चांगलंच मागे टाकल्याचं आपण पाहिलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या घवघवीत यशानंतर ‘कार्तिकेय २’ या चित्रपटाला अभूतपूर्व असं यश मिळालं. आमीरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर येऊन या चित्रपटाने आमीरच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर एक वेगळा इतिहास रचला.
याच चित्रपटातील अभिनेता निखिल सिद्धार्थ यांच्याशी ‘टाइम्स नाऊ डिजिटल’ने संवाद साधला. यादरम्यान निखिल यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. चित्रपटाच्या यशाबद्दल निखिल म्हणतात, “हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा होती. शिवाय श्रीकृष्णाचे भक्तदेखील बरेच आहेत, पण प्रेक्षक आमच्या चित्रपटाला एवढं डोक्यावर घेतील याचा मी कधीच विचार केला नव्हता.”