राज्यातील 1079 गावांचा 'कारभारी' आज ठरणार

 मुंबई : गावकीच्या राजकारणातील आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. राज्यातील जवळपास १०७९ ग्रामपंचायतींचा कारभारी आज ठरणार असून प्रतिष्ठितांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर एकूण ८७ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंचाची निवड झाली आहे. तर या निवडणुकीत कुणाचा गुलाल असेल हे पाहणे गरजेचे आहे.



राज्यातील १८ जिल्ह्यातील ११६५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यासाठी काल मतदान पार पडले असून ८६ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडला गेला. तर उरलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. तर यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.दरम्यान, शिवसेनच्या दोन्ही गटाच्या नाव आणि चिन्हाच्या बदलानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड

थेट जनतेतून सरपंच निवडीचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर आता या निर्णयानुसार या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने