नवी दिल्ली : आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेसह संघपरिवारातील संघटना विलक्षण सक्रिय झाल्या आहेत. विहिंपने दिल्लीच्या आठङी जिल्ह्यांत आपल्या ‘हितचिंतकां‘ बरोबर संपर्क साधण्यासाठी एका मोहीमेची घोषणा कली आहे.. बजरंग दल, दुर्गा वाहिनी आदींचीही मदत या ‘हितचिंतक' मोहीमेत होईल. विहिंपचे हजारो कार्यकर्ते दिल्लीतील हिंदू समाजात राष्ट्रकार्याबाबत जागृती करतील असे सांगण्यात आले. या मोहीमेत विहिंपतर्फे दिल्लीत घरोघरी जाऊन धर्मांतर आणि लव्ह जिहाद थांबवण्यासाठी आणि घरवापसी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद कशी कटिबद्ध आहे ही माहितीही देण्यात येणार आहे.

विहिंपचा दावा आहे की जनसेवेसाठी विहिंपच्या कार्याचा विस्तार करणे हे हितचिंतक अभियानाचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक वंचित समाजाला सेवा कार्याशी जोडणे, सनातन धर्माचे संस्कार नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे, गो रक्षण, सामाजिक एकोपा, महिला सक्षमीकरण, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण संरक्षण तसेच मठ आणि मंदिरांची सुव्यवस्थित व्यवस्था तसेच हिंदू समाजाचे संघटन आणि संरक्षण करणे. संकल्पाची भावना जागृत करणे हेदेखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.विहिंपचे सुरेंद्र गुप्ता, सुमीत अलग, बजरंग दलाचे भारत बत्रा, दुर्गा वाहिनीच्या अरुणा राठोड तसेच इंद्रजीत सिद्धू, नीतू आहुजा, मनोज शर्मा आदी या हिंतचिंतक मोहीमेचे संचालन करणाऱयांत आहेत.