2047 पर्यंत आपल्याला असा भारत घडवायचा आहे ज्यामध्ये भूतकाळाचा गौरव जोडलेला असेल : राष्ट्रपती

दिल्ली:  आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण चालू आहे.2047 पर्यंत आपल्याला असे राष्ट्र घडवायचे आहे जे भूतकाळातील अभिमानाशी जोडलेले असेल आणि ज्यामध्ये आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असतील. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो 'आत्मनिर्भर' असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल असे राष्ट्रपती म्हणाल्या.माझे सरकार राष्ट्र उभारणीचे कर्तव्य पार पाडण्यात गुंतले आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले. स्वप्ने पूर्ण करणारे हे सरकार आहे. आज भारतात प्रामाणिकपणाचे पालन करणारे सरकार आहे.



आज भारतामध्ये गरिबीचे कायमस्वरूपी निराकरण आणि त्यांच्या कायमस्वरूपी सक्षमीकरणासाठी काम करणारे सरकार आहे. आज भारतासाठी मोठ्या आणि उत्कृष्ट स्तरावर काम करणारे सरकार आहे.आज भारतात प्रगतीसोबतच निसर्गाची काळजी घेणारे सरकार आहे. आज भारतात वारसा जपत आधुनिकतेला चालना देणारे सरकार आहे. मोदी सरकारचे कौतुक करताना राष्ट्रपती यांनी गौरवपर उद्गार काढले.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, विकासाच्या कर्तव्याचा मार्ग अवलंबत माझे सरकार काही वर्षांत नऊ वर्षे पूर्ण करेल. माझ्या सरकारच्या जवळपास नऊ वर्षात भारतातील जनतेने प्रथमच अनेक बदल पाहिले आहेत.यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताचा आत्मविश्वास पहिल्यांदाच उंचावला आहे. जो भारत पूर्वी बहुतेक समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून होता. आज तो इतरांच्या समस्यांवर उपाय बनत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने