कसोटी मालिकेपूर्वी विराट-अनुष्काची पुन्हा आध्यात्मिक यात्रा; थेट पोहोचले मोदींच्या गुरू चरणी

ऋषिकेशभारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली सध्या टीम इंडियातून ब्रेकवर आहे. आपल्या मोकळ्या वेळेत माजी कर्णधार पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघाला आहे. विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेशला पोहोचला आहे, जिथे त्यांनी स्वामी दयानंद जी महाराजांच्या आश्रमाला भेट दिली. स्वामी दयानंद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरू होते. सध्या सोशल मीडियावर विराट आणि त्याच्या पत्नीचे फोटो व्हायरल होत आहेत.या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली वृंदावनला गेला होता, जिथे त्याने पत्नी आणि मुलीसह बाबा नीम करोली यांच्या आश्रमाला भेट दिली. ब्रेकमधून आल्यानंतर विराट 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका वनडे मालिकेत त्याच्या बॅटचा जोरदार चालली.




भारत न्यूझीलंड वनडे मालिकेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दोन्ही देशांमधील टी-20 मालिकेतून ब्रेक देण्यात आला होता. त्याचे पुढील लक्ष्य 9 फेब्रुवारीपासून सुरू होणारी भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका आहे. ही मालिका मोठ्या फरकाने जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी विराट कोहली पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघाल्याचे मानले जात आहे. श्रीलंका-न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट जोरदार बोलेल, अशी त्याला आशा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने