दिल्ली: देशातील लोकांचे आधार आता अधिक सुरक्षित झाले आहे. त्यामूळे देशभरात कुठेही तूमची फसवणूक केली जात असेल तर ते तूम्हाला लगेच समजू शकते. असे फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्डमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा केल्या आहेत.युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भारतात लोकांना आकार नंबर देत सर्वत्र आधार कार्ड बनवते. UIDAI ने या आठवड्यात आधार संबंधीत सुरक्षेसाठी नवीन द्वि-स्तरीय सुरक्षा यंत्रणा सुरू केली आहे. यात आधार-बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि स्पूफिंग प्रयत्नांची जलद ओळख याचा समावेश आहे.
काय आहेत याचे फायदे
- देशात कुठेही तूमचे आधारकार्ड दुसरा कोणी व्यक्ती वापरत असेल तर ते लगेच समजेल.
- आधार आधारित पैशाचे व्यवहार सुरक्षित होतील.
- गुन्हेगारांकडून आधारचा गैरवापर करण्याच्या प्रयत्नांना आळा बसेल.
- बँकिंग आणि आर्थिक, दूरसंचार आणि सरकारी क्षेत्रात हे अत्यंत उपयुक्त ठरेल.