'सलमान खान असतो तर...', करण जोहर 'बिग बॉस 16'मध्ये बोलला ही मोठी गोष्ट

मुंबई: लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' चा ग्रँड फिनाले लवकरच होणार आहे. सध्या सलमान खान वीकेंड का वार होस्ट करत नाहीये. गेल्या वीकेंड वारचे होस्टिंग फराह खानने केले होते आणि यावेळी प्रसिद्ध निर्माता करण जोहर होस्ट म्हणून दिसणार आहे.'बिग बॉस 16' चा आगामी भाग खूप धमाकेदार असणार आहे. लेटस्ट प्रोमोमध्ये करण जोहर केवळ स्पर्धकांनाच क्लासेस देत नाही, तर त्याच्या लग्नाबद्दलही बोलत आहे. या शोमध्ये बादशाह चीफ गेस्ट म्हणून येणार आहे, जो करणला त्याच्या लग्नाबद्दल विचारेल.

बादशाहने करण जोहरला अनेक प्रश्न विचारले. एक प्रश्न होता- त्याने स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मनोरंजक अफवा कोणती आहे? यावर करण म्हणाला की, मी लग्न करणार असल्याचे ऐकले होते. त्यानंतर बादशाहने करणला विचारले की तो सलमान खानच्या जागी असता तर काय केलं असतं. करणने लगेच उत्तर दिले की तो सलमान खानच्या जागी असता तर त्याने लग्न केले असते. बादशाहने पुन्हा विचारले की तू अजून लग्न का केले नाहीस? यावर करण म्हणतो, "मी लग्न का केले नाही हे संपूर्ण जगाला माहीत आहे."



आगामी एपिसोडमध्ये करण जोहर स्पर्धकांचा जोरदार क्लास घेताना दिसणार आहे. गेल्या एपिसोडमध्ये अर्चना गौतमने शिव, स्टेन आणि निमृत यांच्या तोंडाला हळद-मीठ लावले होते. करण अर्चनाला राग काढल्याबद्दल फटकारतो. अर्चना म्हणाली की ती खुन्नस काढत नव्हती, मग करण तिला सांगतो की तिच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होतं की ती खुन्नस होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने