हनुमान चालिसेला विरोध केला म्हणून श्रीरामांनीच धनुष्यबाण हिसकावून घेतला - रवी राणा

मुंबई : शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नावच गोठवलं आहे. हे श्रीराम आणि हनुमानांच्या शापामुळे झालं, असं मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे. हनुमान चालिसेलाच विरोध केल्याची शिक्षा त्यांना मिळत असल्याचंही राणा म्हणाले आहेत.



उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. हनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांच्या माध्यमातून जेलमध्ये टाकलं. राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला आणि हनुमान चालिसेचा विरोध केल्यामुळेच आज उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण हे चिन्ह श्री राम भगवंतांनी हिसकावून घेतलं आहे. उद्धव ठाकरेंना शिक्षा मिळाली आहे. त्यांनी १४ दिवस एका महिलेला जेलमध्ये टाकलं, म्हणून श्री राम भगवंतांनी आणि हनुमानांनी त्यांना शाप दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं धनुष्यबाण चिन्ह गोठलेलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने