सत्ता ठराविक घराण्यांच्याच हातात; उदयनराजेंचा रोख कोणाकडे?

सातारा:  महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांकडून हे करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगलप्रभात लोढा या भाजपशी निगडीत नेत्यांकडून महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरून भाजपचे खासदार छत्रपती छत्रपती उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी आज साताऱ्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकशाहीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.



उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. जगात अनेक देशांमध्ये अजुनही राजेशाही आहे. शिवाजी महाराजही राजेशाही ठेवू शकले असते. मात्र त्यांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. जगात एकमेव छत्रपती शिवाजी महाराजच होते की, त्यांना वाटत होतं की, लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा, असं वाटत होतं

जाती-जातीमध्ये वैयक्तीक स्वार्थापायी वाद निर्माण केले जात आहेत. सर्वधर्मसमभावाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली नसती तर आज परिस्थिती आणखी भीषण असती. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर लोकशाहीतील राज्यांनी केलं तर काय? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला. तसेच आता ठरविक घराण्यांच्याच हाती सुत्रं गेल्याचं उदयनराजे म्हणाले. मात्र उदयनराजेंचा रोख कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने