कोकणवासीयांना उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिला शब्द; काय आहे प्रकरण?

मुंबई: स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेली फडणवीस यांनी कोकणवासीयांना मोठा शब्द दिला आहे. “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही” असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. कोकण महोत्सव बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पासंदर्भात मोठं भाष्य केलं आहे.



काय म्हणाले फडणवीस?

“प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही”, असं फडणवीस म्हणालेत. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिले.कोकणाने काही लोकांना भरभरून दिलं मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केलं नाही. मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं कोकणाचा विकासाकडे विशेष लक्ष आहे. कोकणाच्या विकासाचं धोरण ते आखत आहेत. कोकणामध्ये नवनवीन योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असही फडणवीस म्हणाले.

तसेच, रिफायनरी संदर्भात पाच हजार एकरामध्ये ग्रीनरी करण्याची अट दिली होती. तिथे जवळपास रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असता. काही लोकांना कोकणाचा विकास नकोय त्यांना कोकण हा मागास ठेवायचा आहे. आम्हाला मात्र कोकणाचा विकास करायचा आहे.त्यादृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. रिफायनरी प्रकल्प हा आम्ही कोकणामध्ये करणार आहोतच आणि जेणे करून लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असं म्हणत रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने