मी भजन जरी केलं तरी... अमृता फडणवीस ट्रोलर्सबद्दल काय म्हणाल्या?

पुणेः अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलं आणि नेटकऱ्यांची एकच झुंबड उडाली. या गाण्याने व्ह्यूव्हजचा विक्रम प्रस्थापित केलेला असला तरी सोशल मीडियातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.अमृता फडणवीस कार्यक्रमानिमित्त पुण्यात होत्या. त्यांना त्यांच्या नवीन गाण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सर्वांना हे गाणं भरभरुन आवडल्याचं सांगितलं. ट्रोलर्सशी संबंधित प्रश्नावरही त्यांनी चपखल उत्तर दिलेलं आहे.मी भजन जरी म्हटलं तरी लोक मला ट्रोल करतील, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. शिवाय पती देवेंद्र फडणवीस यांना हे गाणं आवडल्याचं त्यांनी नमूद केलं.



अमृता फडणवीस यांचं नुकत्याच रिलीज झालेल्या 'मूड बना लिया' या गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तर काही जण ट्रोल देखील करत आहेत.अमृता फडणवीस म्हणाल्या की, मला खूप आनंद होतोय. लोकांना गाणं आवडलं, स्वीकारलं त्याचे रिल्स होत आहेत. माझा विश्वास आहे. कोणीही काही बोलले तरी काम करत राहिले.  ट्रोल होण्याची सवय झाली मला, त्याने मला फरक पडत नाही अशा शब्दात ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

गाण्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अमृता फडणवीस यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गाणं कसं वाटलं याबद्दलही माहिती दिली आहे. देवेंद्र गाणं चांगलं आहे असं म्हणाले असं त्या म्हणाल्या . तसेच मला पंजाबी गाणं आवडलं म्हणून ते गाणं केलं असल्याचंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने