संजय राऊत आमच्या मतांवर खासदार : अब्दुल सत्तार

नंदुरबार : पुढची गुढी आपलीच असणार, असे म्हणणारे खासदार संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून दाखवावे, त्या वेळेस तुमचे सरकार येईल, असा टोला लगावत अब्दुल सत्तारांनी  संजय राऊत  यांच्या विधानाचा समाचार घेतला.नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीच्या पाहणीसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी (ता. २२) आले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की राऊत आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत.



त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारावे आणि पुन्हा निवडून दाखवावे. त्या वेळेस तुमचे सरकार येईल आणि राऊत यांनी राजीनामा दिला नाही तर दोन-चार पिढ्या यांचे सरकार येणार नाही. राऊत यांचा नातू जरी आला तरी सरकार येणार नाही, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर केलल्या आरोपांनाही सत्तारांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की राऊत कधीच खरे बोलत नाहीत, त्यामुळे दादा भुसे यांनी दिलेल्या चॅलेंजमुळे मिरची लागत आहे. राऊत बोटावर मोजण्याइतक्या आमदार-खासदारांचे नेते आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोलावे अन्यथा आम्हीही बोलू शकतो, राऊत यांनी ज्यांचे नमक खाल्ले आहे त्यांची तरी जाण ठेवावी, अशी टीका सत्तार यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने