विरार स्थानकात रेल्वेने कुटुंबाला उडवलं; पती पत्नीसह तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू

मुंबई: विरार रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलंडणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना रेल्वेने धडक दिल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये एक पुरुष, महिला व तीन महिन्यांचा बाळाचा समावेश आहे.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली.



या अपघातात महिला-पुरुष आणि तीन महिण्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृतकांची ओळख अजून पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.रेल्वे स्थानकावर प्रशासनाकडून रेल्वे रुळ ओलांडताना नियामांचे पालन करण्याच्या सूचना सातत्याने केल्या जातात मात्र तरी देखील नागरिकांकडून त्यांचे पालन केले जात नाही. ही चुक आजवर अनेकांच्या जीवावर बेतली आहे.दररोज कितीतरी नागरीक चुकीच्या पध्दतीने रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमवतात. दरम्यान या रेल्वे अपघातात संपूर्ण कुटुंबच गेल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने