कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर; पाणी पातळी पोहचली ३१ फुटांवर, ५१ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर: शहरासह जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा देखील हायअलर्टवर गेली आहे. तर रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी आपल्या पात्राबाहेर पडली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ३१ फूट ६ इंचावर गेली आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट येथे पाणी पात्रा बाहेर पडल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरत आहे. तर येथे आता पाणी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच NDRF ची पहिली तुकडी देखील कोल्हापुरात दाखल झाली असून सोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सव्यमसेवक ही अलर्ट झाली आहे.


पंचगंगा पाणी पातळी झपाट्याने वाढ:
जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर सदृश्य परीस्थिती निर्माण होते की काय असे वाटू लागले आहे. कारण गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा , राधानगरी यासह धरण क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणात ६२.६१ % पाणी साठा झाला आहे. यामुळे धरणाच्या पॉवर हाऊस मधून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.यामुळे पंचगंगा पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असून आता पर्यंत जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर आज सकाळी ७ वाजता पंचगंगेची पाणी पातळी ३१ फूट ६ इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे.पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाटाने होणारी वाढ पाहता प्रशासन देखील अलर्ट झाल असून ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आले आहे असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे.
पंचगंगा पात्राबाहेर पाणी पातळीत वाढ:
पंचगंगा पाणी पातळी २८ फूट ९ इंचावर पोहचल्याने रात्री दहाच्या सुमारास पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे नदी किनाऱ्याच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पब्लिक अड्रेस सिस्टीमद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाणी पात्रा बाहेर पडल्याने पंचगंगा घाटावर बघ्यांची गर्दी होत असल्याने प्रशासनातर्फे येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील रांगणा किल्ला, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा तसेच भुदरगड तालुक्यालगत असणाऱ्या तोरस्करवाडी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना व स्थानिकांना बंदी घालण्यात आली आहे.तसेच जिल्हा आपती व्यवस्थापन कडून आपत्कालीन नंबर देखील जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले बंधारे:
पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती नदी हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे
कासारी नदी :- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली
हिरण्यकेशी नदी: साळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभिळ, एनापुर
घटप्रभा नदी :- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे- सावर्डे, अडकूर
वेदगंगा नदी :- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरूपली, चिखली
कुंभी नदी :- कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली
वारणा नदी :- चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी
कडवी नदी :- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे
धामणी नदी :- सुळे
तुळशी नदी :- बीड
जिल्ह्यातील हे मार्ग बंद :
जिल्हा मार्ग :
१. आजरा तालुक्यातील हिरणकेशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे नवले देवकांडगाव कोरेवडे, साळगाव मार्ग बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग बाचनी पेरंडोली मार्गे वाहतूक सुरू आहे.
२. शिरोळ तालुक्यातील शिरोळ केटीवेअर वर दोन फूट पाणी आल्याने चिंचवाड, शिरोळ ,कुरुंदवाड, बस्तावाड, अकिटवाड, खिद्रापूर हा रस्ता बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग हा शिरोळ कुरुंदवाड राष्ट्रीय महामार्ग 153 वळवण्यात आला आहे.
३. गगनबावडा तालुक्यातील मोरेवर पाणी आल्याने बाजार भोगाव किसरूळ ते कांजिर्डा घाटात मिळणाऱ्या मार्ग हा बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
राज्य मार्ग:
करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून आंबेवाडी चिखली मार्गे सध्या वाहतूक सुरू आहे तर चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील इब्राहिमपूर पुलावर तीन फूट पाणी आल्याने कानुर कुरणे गवसे अडकूर रस्त्यावर वाहतूक वळवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने