उर्फी जावेद प्रकरण तापलं, चित्रा वाघ यांच्या आरोपांवर रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल; म्हणाल्या, “महिला आयोगाने…”

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. याप्रकरणी काल त्यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयाोगावरही टीकास्र सोडले. महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली होती. मात्र, उर्फीला जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, या आरोपाबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.



काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

काल चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती दिली. अनुराधा बेवसिरीजच्या पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडीतला कोणतीही नोटीस पाठवली नाही. याबाबत आम्ही अनुराधा वेबसिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. आम्हाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस पाठवली असून दिग्दर्शक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले होते. त्यानंतर संजय जाधव यांनी आयोगाला त्यासंबंधित उत्तर दिले. मात्र, यादरम्यान कुठेही तेजस्विनी पंडितचा उल्लेख नव्हता, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने