"आवाज दाबवण्यासाठी सरकार नवं तंत्र शोधतंय"; पत्रकार परिषदेतून काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यानंतर देशभरात खळबळ उडाली असून विरोधकांकडून केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे.दरम्यान, काँग्रेसनं देखील सरकारच्या निर्णयावर टीका केली असून हा लोकशाहीवरचा घाला असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींच्या कारवाईवरुन सरकारला धारेवर धरलं.सिंघवी म्हणाले, राहुल गांधींवर आधी राजकीय कारवाई करण्यात आली त्यानंतर कायद्यानं त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यचा प्रयत्न झाला. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत कारण हा भारतासाठी, सर्व राजकीय पक्षांसाठी, सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी हा सर्वात मोठा राजकीय प्रश्न आहे. हा राजकीय मुद्दा आहे कारण हा पद्धतशीरपणे लोकशाही संस्थांवर घाला आहे.



बदनामी करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपवाद आहे, हे मान्य आहे. पण गेल्या काही वर्षात आपण काहीही विचार न करता अशा प्रकारे वारंवार झाल्याचं पाहिलं असेल. राहुल गांधींचा आवाज दाबवण्याचा हा प्रयत्न असून लोकशाहीवरचा घाला आहे.तुम्हा सर्वांना माहिती आहे की, राहुल गांधी संसदेत आणि संसदेच्या बाहेरही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर बिनधास्तपणे बोलत असतात. याचीच किंमत त्यांना सध्या मोजावी लागत आहे. सरकार त्यांना घाबरलं आहे. आवाज दाबण्यासाठी सरकार आता नवंनवे तंत्र शोधत आहे, असंही यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने