मध्यमहाराष्ट्रासह मराठावाडा, विदर्भाला सतर्कतेचा इशारा; काही ठिकाणी तापमान ४० पार

मुंबई: दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबई आयोजित एका कार्यक्रमात उष्माघाताने १३ भाविकांचा मृत्यू झाला. शिवाय राज्यभरातील तापमानात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.अलर्टमध्ये म्हटलं की, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये.



यानुसार, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धारशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ४० अंश सेल्सियसच्या पुढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत घराबाहेर पडणे, शारिरीक कष्टाची कामे टाळावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने